Team India: याला म्हणतात नशीब! एकही मॅच न खेळता 'हे' 3 खेळाडू बनले चॅम्पियन
Champions Trophy: टीम इंडियाने फक्त 12 खेळाडूंसह संपूर्ण चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. संपूर्ण स्पर्धेत 3 खेळाडू असे होते, ज्यांना एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
Team India ICC Champions Trophy 2025 Champion: टीम इंडिया गेल्या काही काळापासून जबरदस्त क्रिकेट खेळत आहे. कोणताही संघ समोर असला तरी नेहमीच टीम इंडिया वरचढ ठरत आहे. कारण प्रत्येक सामन्यासाठी भारतीय संघ चांगली तयारी करत आहे. हेच कारण आहे की एकामागून एक सामने जिंकत टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम फेरीत गाठली आणि नंतर न्यूझीलंडला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपदही पटकावले. मात्र या स्पर्धेत टीम इंडियाचे तीन खेळाडू असे होते जे एकही सामना खेळले नाहीत, परंतु त्यानंतर ते चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेते बनले. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
टीम इंडियाच्या संघात बदल
बीसीसीआयने 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर केला तेव्हा संघात 15 खेळाडू होते. मात्र नंतर त्यात बदल करण्यात आला. आधी जसप्रीत बुमराह संघात होता, मात्र दुखापतीतून न सावरल्यामुळे त्याच्या जागी अचानक हर्षित राणाला संधी मिळाली. तसेच यशस्वी जयस्वालला वगळण्यात आले आणि वरुण चक्रवर्तीला संघात स्थान देण्यात आले. संपूर्ण चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाने 5 सामने खेळले आणि या काळात फक्त 12 खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. म्हणजे तीन खेळाडू एकही सामना खेळू शकले नाहीत.
हे खेळाडू एकही सामना खेळू शकले नाहीत
यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकही सामना न खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर आणि अर्शदीप सिंग यांचा समावेश आहे.या तिघांना कोणत्याही सामन्याच्या प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली नाही. भारताने आपल्या संघात पाच फिरकीपटूंना संधी दिली होती. यापैकी वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल खेळले. त्यामुळे वॉशिंगटन सुंदरला संधी मिळाली नाही.
केएल राहुलला पहिल्याच सामन्यात यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून संधी देण्यात आली. तो चांगला खेळला, त्यानंतर संघाला कोणताही बदल करण्याची गरज वाटली नाही. त्यामुळे ऋषभ पंतलाही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. दुबईच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना फारशी मदत नव्हती. सुरुवातीचे 2 सामने खेळल्यानंतर हर्षित राणालाही प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले. त्याच्या जागी चक्रवर्तीला संधी दिली गेली. त्यामुळे अर्शदीप सिंगलाही खेळण्याची संघी मिळाली नाही. कारण मोहम्मद शमी हा एक विशेषज्ञ वेगवान गोलंदाज म्हणून भारताची पहिली पसंती होती, त्याला हार्दिक पांड्याने साथ दिली. मोहम्मद शमी या स्पर्धेत चांगली कामगिरी केली. त्यामुळे संघाला जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीची चिंता जाणवली नाही.
Post a Comment