‘या’ 4 लोकांनी चुकूनही पिऊ नका हे ज्यूस, फायद्यापेक्षा कितीतरी पटीने होऊ शकते नुकसान

 

आरोग्य चांगले राहण्यासाठी ज्यूस पिणे चांगले. विशेषतः बीट, गाजर आणि आवळा यांचे ज्युस सर्वात फायदेशीर आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की हाच ज्युस काही लोकांना फायद्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त नुकसान करू शकतो. आज आम्ही तुम्हाला या लेखात सांगणार आहोत की हे ज्यूस कोणत्या व्यक्तीने पिऊ नयेत.



याशिवाय ज्या लोकांना वजन लवकर कमी करायचे आहे ते देखील या ज्युसचे सेवन करत असतात. मात्र हा ज्यूस सर्वांसाठी फायदेशीर ठरेल असे नाही. काही लोकं असेही आहेत ज्यांनी बीट, आवळा आणि गाजर यापासुन तयार केलेले ज्यूस पिणे टाळावे. कारण याचा त्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. जर तुम्हीही तुमच्या आहारात या ज्यूसचा समावेश करण्याचा विचार करत असाल तर सर्वप्रथम तुम्हाला हे जाणून घेणे आवश्यक आहे की कोणत्या लोकांनी ते सेवन करू नये. चला तर मग जाणून घेऊयात…

कमी रक्तदाबाच्या रुग्णांनी हा ज्यूस पिऊ नये

ज्या लोकांना कमी रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी चुकूनही बीट, गाजर आणि आवळा यांचा ज्यूस पिऊ नये. जर तुम्ही हा ज्यूस प्यायलात तर रक्तदाबाची समस्या आणखी वाढू शकते. ज्यामुळे तुम्हाला अचानक चक्कर येऊ शकते. त्याच वेळी डोकेदुखीची समस्या देखील तुम्हाला त्रास देऊ शकते.

किडनीच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या रूग्णांनी

जर तुम्हाला किडनीशी संबंधित कोणताही आजार असेल तर अशा परिस्थितीत बीटाचा ज्यूस पिल्यास तुमचा आजार आणखी वाढवू शकतो. विशेषतः, किडनी स्टोन असलेल्या लोकांनी बीट, आवळा आणि गाजरचा ज्यूस पिणे टाळावे कारण बीटमध्ये असलेले ऑक्सलेट किडनी स्टोनची समस्या आणखी वाढवू शकते.

गर्भवती महिलांनी हा ज्यूस पिऊ नये

गर्भवती महिलांनी गाजर, बीट आणि आवळ्याच्या ज्यूसपासून दूर राहावे. कारण गरोदरपणात खाण्यापिण्याची विशेष काळजी घेतली जाते. शिवाय हे ज्यूस गर्भवती महिलांसाठी हानिकारक देखील ठरू शकते. जर तुम्ही गरोदर असाल आणि हे ज्यूस पिण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच ज्यूसचे सेवन करावे.











No comments

Powered by Blogger.